गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
समता, न्याय व आत्मबळाचा संदेश देणारी “महा सम्राट बळीराजा रथयात्रा २०२५” दिनांक ११ ते १४ ऑक्टोबर २०२५ दरम्यान पार पडणार आहे. ही रथयात्रा गुरुकुंज मोझरी (ता. तिवसा, जि. अमरावती) येथून सुरू होऊन शिवतीर्थ उमरी (ता. सावनेर, जि. नागपूर) येथे समारोपास येईल.
या यात्रेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे वं. तुकडोजी महाराज पुण्यतिथीच्या निमित्ताने गुरुकुंज मोझरी येथे होणाऱ्या कार्यक्रमात सामील होऊन ही यात्रा सुरू होते. सामाजिक, शैक्षणिक व आध्यात्मिक जागृतीचे ध्येय बाळगून ही रथयात्रा विदर्भातील विविध जिल्ह्यांतून जनजागृती करणार आहे.
🛣️ भ्रमण मार्ग व मुक्काम (संक्षिप्त):
१० ऑक्टोबर २०२५ – प्रस्थान:
उमरी → नांदा → पिपळा → सावरगाव → काटोल → मूर्ती → ठाणेगाव → कारंजा → तळेगाव → तिवसा → मोझरी (मुक्काम)
११ ऑक्टोबर – शुभारंभ:
सकाळी ९:०० वाजता रथयात्रेचा गुरुकुंज मोझरी येथून शुभारंभ
तुकडोजी महाराज पुण्यतिथी कार्यक्रमात सहभाग
नांदगाव पेठ (मुक्काम)
१२ ऑक्टोबर – अमरावती ते यवतमाळ:
अमरावती शहर → बडनेरा → चोरमौली → नेर → मालखेड → लोहारा → यवतमाळ शहर (मुक्काम)
१३ ऑक्टोबर – वर्धा ते नागपूर:
बाभुळगाव → पुलगाव → वर्धा शहर → सेलू → बुटीबोरी → नागपूर शहर → उमरी (मुक्काम)
१४ ऑक्टोबर – समारोप:
समारोपीय कार्यक्रम: उमरी, सकाळी १०:०० ते दुपारी २:००
🌟 उद्दिष्ट व संदेश:
या रथयात्रेचा उद्देश समता, शाश्वत विकास, पर्यावरण जागरूकता, आणि ग्रामीण सशक्तीकरण या मुद्द्यांवर लोकांमध्ये संवाद निर्माण करणे आहे. सामाजिक समरसतेचा आणि बळीराजाच्या सन्मानाचा नवा अध्याय ही यात्रा लिहिणार आहे.




